Friday, March 17, 2017

What is Mutual Funds and how safe it is to invest in it



With the rate on interests on Fixed Deposits going down every year, many common citizens like you and me are left with the question where to invest the surplus money. 

The ads on Tv, Radio and Papers will suggest you an answer  - Mutual Funds.

This is my layman's attempt to explain in simple terms about Mutual Funds. For more clarity refer some good websites for technical and exact financial knowledge. 

So what is Mutual Funds - Mutual funds is a fund of amount of sum which is invested in a typical group of company shares depending upon the type of mutual funds you are buying. So basically when you are buying a mutual funds, then you are buying various company shares at a time. So the performance of the mutual funds depends on the performance of individual company shares. It also depends on how much % of total fund is invested in which companies. Hence the top companies in which your majority of funds are invested mostly will drive the performance of overall fund. 

Mutual funds are of different types, e.g industry based, company size based, index based, fund of funds etc and any more. There is no limit to creativity of fund managers to chose the various companies and make a fund. Hence depending upon the performance of respected industry or category the performance of fund will change. 

There are two ways on investing in Mutual Funds. 
- Lumpsum
- SIP - Systematic Investment Plan. 

In lumpsum you put money in mutual fund in one go and the returns will depend upon the performance of the market as compared to the date on which mutual funds was purchased. The advantage is you get good returns if funds performs well. Disadvantage is loss is equally proportional in case market goes down. Also this option is for people who have lumpsom money available for investment. 

In SIP you invest a particular small sum every month in the given MF like an recurring deposit. So the depending upon the NAV of that MF in that day of month you get the number of units. SIP has two advantages. 1. You can invest small amounts hence no need to stretch in financial plan. 2. it distributes the risk over 12 months. So it takes care of markets ups and downs. SIP in past few years have given better returns too. 

Since if a developing growing economy with sizable domestic consumption it is expected that as the economy will grow in future the investments in markets will keep giving better returns than Ban FD's and many a times returns will be in multiple times against FD. 

Only hitch remains, as they in say MF advertisements, that since investment is done in share market ultimately the returns are subject to market risks. There is a chance that you might loose money too and there is a chance that you can get quite good returns too. 

So if you have your basic finance & expenses covered and have surplus funds which you can take a bit of risk with you can put money in MF. MF in past few years have been giving better returns than banks & gold. 

Monday, September 1, 2014

स्कूटरवाले काका - scooterwale kaka

अमितगाथा ०१.०९.२०१४

आज सकाळी ऑफिसच्या  खाली रस्त्यावर गाडी लावूनबाहेर पडलो, तर मागे काही तरी आवाज झाला. वळून बघितला तर एक वृद्ध काका स्कूटर वरून खाली पडत होते. समोर चालल्याला एक चार चाकी वाल्याने बहुतेक अचानक ब्रेक मारल्यामुळे, काका मागून जावून त्याला धडकले होते. मी पळालो आणि त्यांना उचलल. बाकी बरेच लोक आले. सर्वांनी मग काकांना रोड च्या कडेला बसवल. कुठे काही लागला नव्हता पण काका थोडे घाबरलेले दिसत होते. त्यांना सरळ बोलता येत नव्हत. तेवढ्यात कोणी तरी पुढच्या गाडीच्या driver ला खाली ओढून चोप दिला. तो माझी काही चूक नाही, काका मागून येवून धडकले असा बोम्बलत होता. लागला नाही म्हटल्यावर थोड्या वेळाने सर्वजण निघून गेले. तो driver पण हळूच सटकला होता. काका अजून पण सरळ उभे राहू शकत नव्हते. थोडे हाथ पाय थरथर कापत  होते. थोडे पाणी दिल्यावर मग ते जरा बरे तरतरीत झाले. मी काकांना विचारला जमेल का गाडी चालवायला. काका एकदम कॉन्फिडन्स मध्ये म्हनले "अरे बिंदास, ओके आहे आपण ". पण काका अजून पण थोडे हलतच होते. मग काकांनी मग माझी विचारपूस केली, आणि आणि देवासारखा आलास  म्हणून एक दम मिठीच मारली. मी इट्स ओक काका , यु आर वेलकम म्हनुन बाजूला झालोच होतो कि काकांचा अंगा-तोंडावरून एक गर्द वास आला…. डोक्याला झिणझिण्या आल्या आणि मग मला काकांच्या हलण्याचा रहस्य कळला आणि हे पण कळला कि तो ड्र्यव्हर बरोबर बोलत होता. कारण काका सकाळी सकाळीच मस्त चार पेग लावून झिंगून गाडी चालवत होते… 

मी बिचाऱ्या ड्राईव्हर चा विचार करत ऑफिसकडे निघालो आणि मागे काका हलत हलत गाडीला किक मारून, पुढच्या साहसी प्रवासाला निघले. 


- अमित पायगुडे 

Tuesday, July 1, 2014

Circular Rainbow

I was lucky on a flight from Chennai to Andaman in December 2014, when I could see a rare phenomenon of a complete ring of rainbow. 

The rare phenomenon can be seen, when you are travelling in flight over a cloud over and Sun is at a particular angle to you. 

Best part was the rainbow ring was travelling along with me for a quite some time, till i got bored of watching it. But watching it for the first time was an amazing experience. 

This was one the starting fun to my Andaman trip, which in 4 days gave me various new experiences, insights and a lifetime memories. 


Tuesday, April 29, 2014

Amitgatha Says "The rate of you meeting irritaing people is directly proportional to integrity of your thought of being Calm n Nice to Everyone." 

Monday, March 24, 2014

सुरकुत्या !!

धावपळीत संध्याकाळी एक दिवस आरश्यात पाहावा म्हटलं,
होत चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांनी जाळ मोठा विणल,
बघून चेहरा स्वतःचा, मग मला खरा सत्य कळल,
रोज भविष्याचा विचार करताना
वेड्या, वर्तमानात तर जगायचं राहूनच गेल… 

अमित !! 



Wednesday, March 19, 2014

सरदार मानाजी पायगुडे - झेंडा ‘अटके’पार!

झेंडा ‘अटके’पार!
पानिपतच्या रणांगणावर अगणित मराठी वीरांनी आपले प्रश्नण देशासाठी अर्पण केले आहेत. यामध्ये
पुणे परिसरातील मावळ्यांच्या शौर्याला तोड नाही. पानिपत संग्रामपूर्वी १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला ‘अटक’ चा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात पानिपतवीर मानाजी पायगुडे आघाडीवर होते.


सन १७५८ मध्ये मराठय़ांनी सरहिंद, लाहोर जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमूर आणि सरदार जहाँनखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. जाताना त्यांनी अवजड तोफखाना आणि दिल्लीतील लुटीचा खजिना तेथेच सोडून दिला. त्या वेळी तैमूरने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले. तहमासखान मुक्त झाल्याने त्याने लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे! तारीख होती १० एप्रिल १७५८. ही हकिकत ‘तहमासनामा’ या आपल्या आत्मचरित्रापर ग्रंथात तहमासखानाने लिहून ठेवली आहे. अब्दालीच्या सैन्याचा पाठलाग मराठय़ांनी चालूच ठेवला होता. त्यांनी चिनाब, झेलम अशा मोठय़ा नद्या ओलांडल्या. रावळपिंडीही मराठय़ांनी सर केली व मराठी फौजा सिंधु नदीच्या काठांवर आल्या. नदीच्या पलीकडील काठांवर अटक किल्ला आहे. वायव्य सरहद्दीचे रक्षण करण्यासाठी १५८१ मध्ये अकबराने अटक किल्ला बांधला. मराठी सैन्याने नदीच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज घेतला व नदीवर होडीचा पूल तयार केला. होडीच्या पुलावरून मराठी फौजा सिंधूपार होऊन अटक किल्ल्यापर्यंत आल्या व किल्ल्यावर हल्ला करून तो हस्तगत केला. ‘अटके’ वर मराठी जरीपटका फडकला. ही गोष्ट १० ऑगस्ट १७५८ ची. मराठी फौजेत या वेळी मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव रेठरेकर, गोपाळराव गणेश, तुकोजी खंडोजी कदम, नरसोजी पंडित, साबाजी शिंदे इत्यादी सेनानी आपापल्या पथकाबरोबर होते.
अटकेच्या मोहिमेचे नेतृत्व श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांनी केले. लाहोरहून श्रीमंत रघुनाथरावांचे पत्र पुण्यात आले. बिपाशा नदी तीरावरून सडय़ा फौजा मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव, गोपाळ गणेशसह पुढे रवाना केल्या. पेशवे दप्तर खंड २७/२१८ या मध्ये या बाबतचे पत्र उपलब्ध आहे. ‘अटके’ च्या विजयात सहभागी असलेले सरदार मानाजी पायगुडे यांची इतिहासातील कामगिरी खालील प्रसंगावरून आपल्या समोर येते.
१) सन १७३४ मधील दिल्लीच्या रणसंग्रामात राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, यशवंतराव पवार, गोविंद हरी पटवर्धन इत्यादी ज्येष्ठांबरोबर मानाजी पायगुडे सहभागी होते.
२) १६-२-१७५१ च्या पत्रात नारायणराव घोरपडे व मानाजी पायगुडे यांनी बेळगाव प्रश्नंतात शहापूरची पेठ मारली असा उल्लेख आहे. ३) ३०-११-१७३७ च्या पत्रात म्हटल्याप्रमाणे थोरले बाजीराव यांनी काही घोडे व बंदूकस्वार मानाजींकडे सुपूर्द केले होते. ४) २६-१-१७४८ च्या पत्रात जनार्दन गणेश भाऊसाहेब पेशव्यांना लिहितात, ‘मानाजी पायगुडे व आंग्रे यांची लढाई मसुऱ्यास झाली. आंग्रे भगवंतगडावर पळून गेले. मानाजी पायगुडे यांनी पारगड व शिवगड हस्तगत केला व पोर्तुगीजांना शह दिला.’ ५) २२-१-१७४९ च्या पत्रात विठ्ठल शिवदेव पेशव्यांना आपली हकिकत कळवितात. त्यात मानाजी व त्यांचा पुत्र लालजी यांच्या पराक्रमाचा उल्लेख आहे. बुंदेलखंडात तेजगड किल्ला आहे. ह्य़ा किल्ल्यास तीन हजार सैन्याने वेढा घालून किल्ला मोठय़ा शर्थीने जिंकला. मानाजी व त्यांचा पुत्र लालजी याने पराक्रमाची परिसीमा गाठली. लालजीस वीरमरण आले परंतु किल्लय़ाचा पाडाव झाला. ६) फेब्रुवारी १७५१ च्या पत्रात त्रिंबकराव पेठे सातारा व कोल्हापूर प्रश्नंताची घटना पेशव्यांना कळवतात. त्यात म्हटले आहे, की ‘मानाजी पायगुडे कोल्हापूर प्रश्नंतात तळ ठोकून आहेत व छत्रपती रामराजे कोल्हापूरकर राजकारणावर लक्ष ठेवून आहेत.’ ७) १७५४ च्या पत्रात विठ्ठल शिवदेव लिहितात- राजेश्री मानाजी पायगुडे यांजकडे बाणाची कैची, बाणदार, पैसा सत्वर पाठवायची आज्ञा करावी. ८) १४-२-५६ (१७५६) च्या पत्रात गोविंद बल्लाळ यांनी बकरुल्लाखान याचे बरोबर केलेल्या लढाईचे वर्णन आहे. यातही मानाजींनी मोठा पराक्रम गाजवला. ९) जून १७५७ रोजी मानाजी पायगुडे यांनी दिल्लीहून पुण्यास कळवले आहे, की आम्ही लाल किल्ल्याचा काबूल दरवाजा व लाहोर दरवाजा ताब्यात घेतला आहे व त्यावर पहारे बसवले आहेत. आम्हाला मनुष्यबळ व पैसा पाठवावा, ही विनंती. पानिपत संबंधात मानाजी पायगुडे यांचा बऱ्याच पत्रात उल्लेख आहे. पानिपतच्या ऐतिहासिक पोवाडय़ात समशेरबहाद्दर व मानाजी शेजारीशेजारी उभे राहून लढत होते असा उल्लेख आहे.
कॅ. वासुदेव बेलवलकर यांनी लिहिले आहे, की खैबरखिंडीच्या पायथ्याशी असलेल्या जमरुड या किल्ल्यावर मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर, केशवराव पानसे इत्यादींनी कबजा मिळविला. मराठी फौजा जवळजवळ काबूल नदीपर्यंत गेल्या होत्या, पलीकडून येणाऱ्या शत्रूच्या फौजांना हैराण करण्याचे काम या मराठी फौजेने केले. मानाजी पायगुडे यांची एकंदर कारकीर्द पाहता असे लक्षात येते, की मानाजी हे पेशव्यांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. त्यांचे आयुष्यातील आणखी एक प्रसंग म्हणजे त्यांच्या अपूर्व कामगिरीचा ‘कळस’ म्हणावा लागेल. पेशवे-पोर्तुगीज संबंधातील एक घटना. त्या वेळी गोव्यात मांडवीनदी काठावर मराठा पोर्तुगीज यांच्यात बोलणी चालू होती. नदीकाठी एका तंबूत दोन मराठा सरदार मराठय़ांचे वतीने बोलत होते. नारायण शेणवी नावाचा ब्राह्मण दुभाष्याचे काम करीत होता. मराठय़ांचे वकील म्हणून काम करणारे दोन सरदार होते. मानाजी पायगुडे व सयाजी गुजर! ही बाब सेतु माधवराव पगडी यांनी आपल्या ‘मराठे-पोर्तुगीज संबंध’ या आपल्या पुस्तकात दिलेली आहे. अशा या मानाजी पायगुडे व अन्य सर्वच मराठा सेनानींना मानाचा मुजरा!
अरुण पायगुडे

Taken From, 
लोकसत्ता पुणे वृत्तान्त, सोमवार, १० ऑगस्ट २००९. Credits to original author Mr Arun Paigude.

Wednesday, October 16, 2013

Persecution_of_Hindus

Must read for all Hindus

Pain we went through in history and still on.. 

 http://en.wikipedia.org/wiki/Persecution_of_Hindus





Photograph of the ruins of destructed Surya Temple, The most impressive and grandest ruins in Kashmir, at Marttand-Hardy Cole's Archaeological Survey of India Report 'Illustrations of Ancient Buildings in Kashmir.' (1869)